Pages

Wednesday, February 10, 2010

लिखाण

लिखाण कसे असावे? माहित नाही !!!
कशा बद्दल लिहावे?? माहित नाही !!!
किती लिहावे??  माहित नाही !!!

अलंकारित वाक्यरचना आपल्याला नाय जमत राव .... ह्या बद्दल एक किस्सा सांगतो, लोकमान्य टिळकांचा. त्यांचा पण same problem होता. त्यांची भाषा म्हणजे एकदम रोक-ठोक. एक घाव दोन तुकडे अश्या त्यांच्या खाक्या.
जेव्हा ते मंडाले तुरुंगातून सहा वर्षानंतर सुटले तेव्हा पोलिसांनी त्यांना पहाटे घरी सोडले. पूर्ण पुणेभर वणव्यासारखी बातमी पसरली. आल्या-आल्या टिळकांनी 'केसरी' चा कारभार हातात घेतला. धोंडोपंतांनी एक व्यवस्थित अग्रलेख लिहून टिळकांना नजेरेखालून घालण्यासाठी दिला. त्याचे शीर्षक होते 'लोकमान्य टिळक यांची बंधनमुक्तता' !!!

लोकमान्य उद्गारले, "बाकी मसुदा व्यवस्थित आहे, फक्त शीर्षक तेव्हडे बदला."
धोंडोपंत म्हणाले, "काय ठेवू?"
लोकमान्य म्हणाले, " 'टिळक सुटले !!!' "

कसे एकदम सुटसुटीत शीर्षक आहे ना, नंतर हेच शब्द महाराष्ट्रभर पसरले.
(संदर्भ: 'दुर्दम्य', गंगाधर गाडगीळ)


असो, ह्या सगळ्या मोठ्या-मोठ्या गोष्टी झाल्या. वाटले म्हणून लिहिले.
झोपतो आता.

1 comments:

Poonam said...

खूपच छान :)
अगदी सुटसुटित !

 
/* Vinit Analytics code */